शेती : जमिनीची मशागत करून त्यात पिके घेण्याच्या व्यवसायाला शेती असे म्हणतात. हा व्यवसाय मानव फार पूर्वीपासून करत आला आहे. शेतकरी शेतात कष्ट करून धान्य, फळे, फुले, भाजीपाला, तेलबिया इत्यादी आपल्या सर्वांसाठी पिकवतो. शेतीचे उत्पन्न जमीन, पाणी, हवामान, सूर्यप्रकाश या घटकांवर अवलंबून असते.
![]() |
| shubham dubukwad sheti |
शेतीकाम:
शेतीचे दोन हंगामे पाहू आता तसेच तो कोणत्या ऋतूत घेतात ते पण पाहू
१) खरीप : पावसाळ्यात खरीप हंगाम असतो.
२) रबी :हिवाळ्यात रबी हंगाम असतो.
*आता आपण त्या -त्या हंगामातील कोनकोणती पिके घेतात ते पाहू * :
१) खरीप : खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांना खरिपाची पिके म्हणतात.
पिके : तांदूळ, ज्वारी, बाजरी, मूग, कापूस ही मुख्यतः खरिपाची पिके आहेत.
२) रबी :या हंगामातील पिकांना रबीची पिके म्हणतात.
पिके : गहू, हरभरा, करडई ही मुख्यतः रबीची पिके आहेत.
आता आपण शेती कोणत्या प्रकारे व शेतीचे प्रकार पाहुया
१) जिरायती शेती : केवळ पावसाच्या पाण्यावर केल्या जाणाऱ्या शेतीला जिरायती शेती म्हणतात.
२) बागायती शेती : काही वेळेस सिंचनाने पाणीपुरवठा करून शेती केली जाते.
.माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो हि माहिती तुम्हाला कशी वाटली व आमच्या Shubham Study Inवेबसाईटशी संबंधित काही सूचना किंवा प्रश्न असल्यास आम्हाला कमेंट करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींसोबत हि माहिती शेयर करा, ज्याने करून त्यांचे जनरल नॉलेज वाढेल. धन्यवाद





Post a Comment